।। जय जय रघुवीर समर्थ ।।
सुप्रभातम् !
मागील एक आठवडा वेळ-व्यवस्थापन विषयावर चिंतन करणे जमले नाही त्यासाठी क्षमस्व !
मागील लेखांकात आपण स्वयं-व्यवस्थापनाचे सर्वात महत्वाचे कार्य आपल्या "वेळाचे विश्लेषण" (Time Analysis) यावर चिंतन केले कारण विश्लेषण केल्याशिवाय आपल्याला आपली वर्तमान स्थिती कळणार नाही आणि ती कळल्याशिवाय पुढची आखणी केली तरी त्यात यश मिळत नाही.
आपण आपले दैनंदिन कामांचे विश्लेषण मागील लेखाप्रमाणे आवश्यक 'डेटा' गोळा करून केले तर आपल्याला कळते की आपण आपल्या वेळचा किती भाग 'उत्पादक' कामांना दिला आणि किती भाग 'अनुत्पादक' कामांमध्ये व्यर्थ घालविला.
आज आपण "वेळाचे विश्लेषण" (Time Analysis) याची पुढील पायरी "परेटोच्या ८०/२० सिद्धांतानुसार विश्लेषण" चा आढावा घेऊया.
विल्फ्रेडो परेटो हे इटलीचे एक अभियंता, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी होते. त्यांनी अर्थशास्त्र, विज्ञान आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या अध्ययनाच्या आधारावर हा शोध लावला की इटालीचा ८०% भूभाग हा २०% लोकांच्या मालकीचा होता आणि शेष २०% भूभाग ८०% लोकांच्या मालकीचा होता. त्यांनी हे अनुभवले की ८०/२० हा अनुपात वेळ, विक्री ईतर अन्य क्षेत्रात देखील लागू पडतो. त्यांनी या सिद्धांताला 'परेटो सिद्धांत' असे नाव दिले व हा सिद्धांत जगभरांत '८०/२० नियम' (80/20 Rule) या नावाने प्रसिद्ध झाला. हा सिद्धांत प्रत्येक क्षेत्रांत समतोल साधण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो म्हणून याला "समतोल साधण्याचा नियम" (Balancing Act) देखील म्हणतात. असंतुलनाचे आकलन करण्यास हा नियम आपल्याला फार उपयोगी पडतो आणि या नियमाच्या आधारे आत्म-विश्लेषण केल्याने आपण स्वत:च्या स्वभावात, उत्पादकतेत, वेळ-व्यवस्थापानांत पराकोटीचा बदल घडवून आणू शकतो.
सोप्या भाषेत या सिद्धांताची किंवा मांडायचे असले तर आपण असे म्हणू शकतो की "आपण केलेल्या एकूण प्रयत्नांपैकी २०% प्रयत्नांमुळे आपल्याला ८०% परिणाम मिळतात अर्थात आपले २०% प्रयत्न आपल्या ८०% परिणामांसाठी कारणीभूत ठरतात"
८०/२० नियम हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे कारण या नियमाच्या आधारावर विश्लेषण केल्याने आपल्याला कळते की आपण केलेली ८०% कामे अनुपयोगी, अनुत्पादक, व्यर्थ होती. आपण व्यतीत केलेला ८०% वेळ हा व्यर्थ घालविला आहे असे कळते आणि मग आपली उत्पादकतेकडे, उपयोगीतेकडे, सार्थकतेकडे वाटचाल सुरु होते.
उद्या आपण याच नियमावर विस्तृत चिंतन करूया.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
मागील एक आठवडा वेळ-व्यवस्थापन विषयावर चिंतन करणे जमले नाही त्यासाठी क्षमस्व !
मागील लेखांकात आपण स्वयं-व्यवस्थापनाचे सर्वात महत्वाचे कार्य आपल्या "वेळाचे विश्लेषण" (Time Analysis) यावर चिंतन केले कारण विश्लेषण केल्याशिवाय आपल्याला आपली वर्तमान स्थिती कळणार नाही आणि ती कळल्याशिवाय पुढची आखणी केली तरी त्यात यश मिळत नाही.
आपण आपले दैनंदिन कामांचे विश्लेषण मागील लेखाप्रमाणे आवश्यक 'डेटा' गोळा करून केले तर आपल्याला कळते की आपण आपल्या वेळचा किती भाग 'उत्पादक' कामांना दिला आणि किती भाग 'अनुत्पादक' कामांमध्ये व्यर्थ घालविला.
आज आपण "वेळाचे विश्लेषण" (Time Analysis) याची पुढील पायरी "परेटोच्या ८०/२० सिद्धांतानुसार विश्लेषण" चा आढावा घेऊया.
विल्फ्रेडो परेटो हे इटलीचे एक अभियंता, समाजशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकीय शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञानी होते. त्यांनी अर्थशास्त्र, विज्ञान आणि व्यवस्थापनाच्या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यांनी आपल्या अध्ययनाच्या आधारावर हा शोध लावला की इटालीचा ८०% भूभाग हा २०% लोकांच्या मालकीचा होता आणि शेष २०% भूभाग ८०% लोकांच्या मालकीचा होता. त्यांनी हे अनुभवले की ८०/२० हा अनुपात वेळ, विक्री ईतर अन्य क्षेत्रात देखील लागू पडतो. त्यांनी या सिद्धांताला 'परेटो सिद्धांत' असे नाव दिले व हा सिद्धांत जगभरांत '८०/२० नियम' (80/20 Rule) या नावाने प्रसिद्ध झाला. हा सिद्धांत प्रत्येक क्षेत्रांत समतोल साधण्यासाठी आपल्याला उपयोगी पडतो म्हणून याला "समतोल साधण्याचा नियम" (Balancing Act) देखील म्हणतात. असंतुलनाचे आकलन करण्यास हा नियम आपल्याला फार उपयोगी पडतो आणि या नियमाच्या आधारे आत्म-विश्लेषण केल्याने आपण स्वत:च्या स्वभावात, उत्पादकतेत, वेळ-व्यवस्थापानांत पराकोटीचा बदल घडवून आणू शकतो.
सोप्या भाषेत या सिद्धांताची किंवा मांडायचे असले तर आपण असे म्हणू शकतो की "आपण केलेल्या एकूण प्रयत्नांपैकी २०% प्रयत्नांमुळे आपल्याला ८०% परिणाम मिळतात अर्थात आपले २०% प्रयत्न आपल्या ८०% परिणामांसाठी कारणीभूत ठरतात"
८०/२० नियम हा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे कारण या नियमाच्या आधारावर विश्लेषण केल्याने आपल्याला कळते की आपण केलेली ८०% कामे अनुपयोगी, अनुत्पादक, व्यर्थ होती. आपण व्यतीत केलेला ८०% वेळ हा व्यर्थ घालविला आहे असे कळते आणि मग आपली उत्पादकतेकडे, उपयोगीतेकडे, सार्थकतेकडे वाटचाल सुरु होते.
उद्या आपण याच नियमावर विस्तृत चिंतन करूया.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।