Total Pageviews

Tuesday, August 23, 2016

'स्वयं-व्यवस्थापनामुळे आपल्याला वेळ-व्यवस्थापन कसे साध्य होते?' वेळ-व्यवस्थापन भाग-१६ (Time Management Part-16)


।। जय जय रघुवीर समर्थ ।।

सुप्रभातम्  !

काही अपरिहार्य अडचणींमुळे काल चिंतन संभव झाले नाही त्यासाठी क्षमस्व ! 

                       परवा आपण वेळ-व्यवस्थापनासाठी अत्यावश्यक 'स्वयं-व्यवस्थापनाचे चार आधार स्तंभ' या विषयावर चिंतन केले. आज 'स्वयं-व्यवस्थापनामुळे आपल्याला वेळ-व्यवस्थापन कसे साध्य होते' यावर चिंतन करूया.

  • स्वयं-व्यवस्थापन हे तत्व-केंद्रित असल्याने अतिशय महत्वाचे आणि परिणामकारक देखील आहे. स्वयं-व्यवस्थापन करणारा व्यक्ती स्वत: ती तत्वे जगत असल्याने चौकोन २ च्या कामांबद्दल केवळ निव्वळ बडबड करण्यापेक्षा ती कामे करून आपला वेळ वाचवीत असतो. त्याला चौकोन २ च्या कामांचे महत्व कळलेले असते.
  • स्वयं-व्यवस्थापन हे आपल्या विवेकाद्वारे संचालित असते. आपल्या मनांत खोलवर मुरलेल्या मूल्यांशी सुसंगत असल्यामुळे आपल्या नियोजन-क्षमतेचा सर्वोत्कृष्ट उपयोग करून आपल्या संपूर्ण आयुष्याची आखणी करून योग्य मार्ग निवडण्याची संधी आणि स्फूर्ती देते .

    हे करतांना बऱ्याचदा आपल्या मूल्यांना प्राधान्य देत गरज पडल्यास आपले वेळा-पत्रक बाजूला ठेवण्याचे स्वातंत्र्य देऊन आपल्याला मूल्याधारित कामे आधी करण्यास प्रवृत्त करते.

  • स्वयं-व्यवस्थापन आपल्याला लघु आणि दीर्घ पल्ल्यांची उद्दिष्टे ठरविण्यासाठी प्रवृत्त आणि मदत करते . आपली उद्दिष्टे ठरविल्यामुळे आपल्याला वारं-वार त्या मूल्यांची आठवण करून देत आपल्या जगण्याला हेतू आणि योग्य दिशा देते.

  • स्वयं-व्यवस्थापनामुळे आपल्या स्वत:च्या भूमिका ठरविण्यास मदत मिळते आणि प्रत्येक भूमिकेसाठी वेळ काढून तिच्याशी संबंधित उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी आपण प्रवृत्त होतो जेणेकरून आपल्याला आपल्या सर्व महत्वाच्या भूमिकांमध्ये योग्य समतोल राखता येतो, प्रत्येक भूमिकेबरोबर न्याय करता येतो, कुठल्याही भूमिकेकडे दुर्लक्ष किंवा कुठल्याही भूमिकेची अवहेलना आपल्या हातून होत नाही.

  • स्वयं-व्यवस्थापनामुळे  अव्यवस्थितपणापासून आपली सुटका होते. आपण एक व्यवस्थित जीवन जगू लागतो. आपले केवळ दैनंदिन कार्यच नव्हे तर संपूर्ण आठवडाभराची कामे, कर्तव्य, वैयक्तिक, पारिवारिक , व्यावसायिक आणि सामाजिक दायीत्वे असे सर्व काही आपल्याला अगदी सुस्पष्ट दिसत असल्याने सर्व काही साध्य करण्याची ईच्छा मनांत जागृत होते आणि सर्व काही साध्य करणे देखील सोपे होते.


                   स्वयं-व्यवस्थापनाने आपला व्यावहारिक धागा आणि नाते-संबंध दोन्हीं मजबूत होतात जेणेकरून आपण 'हार्ड वर्क' या संकल्पनेतून 'हार्ड आणि स्मार्ट वर्क दोन्हींचा समतोल राखणे' या संकल्पनेकडे झेप घेतो ज्याच्या परिणामस्वरूप आपल्याला आपले वेळ-व्यवस्थापन आणि यश-संपादन दोन्ही अगदी सहजपणे साध्य होतात.
।। जय जय रघुवीर समर्थ ।।

No comments:

Post a Comment